म्हातारं

October 8, 2016

लेखन

arvind jagapat patra

म्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातं

म्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातं
म्हातारं येणार्या जाणार्याकडं डोळे फाडून बघतं
म्हातारं कामवालीसोबत गुलुगुलू बोलत बसतं
म्हातारं मुद्दाम मळकट कपडे घालतं
म्हातारं रात्रभर कानात शिरुन खोकत रहातं
म्हातार्यानं घराचा नरक बनवलाय सगळा
मेलो रेमेलो रे…’ म्हणतं पण म्हातारं मरतही नाही

ऐकता ऐकता
शेवटी एकदाचं मरुन गेलं म्हातारं

खुप चांगले होते
गिरणीवरुन दळूण आणायचे
कामवालीकडून चांगलं काम करुन घ्यायचे
साधेपणानं रहायचे
मुलांना खाऊ घालायचे
ते होते तोवर घराला कुलूप लावावं लागलं नाही कधी
म्हातारं माणूस असलं पाहिजे घरात, घराला आशिर्वाद मिळत राहातात

ऐकण्यासाठी
आता जिवंत नाहीय म्हातारं

<strong>मुळ कविताविनय विश्वास</strong>
<strong>अनुवादपृथ्वीराज तौर</strong>

संगमनेरमधल्या सायखिंडीचे सिताराम राऊत. वटसावित्री पौर्णिमेला त्यांनी शंभर जोडप्यांच्या हाताने शंभर वड लावले.

‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’या कथासंग्रहाची आठवी आवृत्ती आलीय. वाचकांचे मनापासून आभार. विशेषत: पत्र, मेल लिहून प्रतिक्रिया देणारी तरूण पिढी. तुमचे शब्द बळ देतात. तरूण वाचक एवढं भारी लिहितात की खुपदा वाटतं त्यांच्यासारखं थेट मनातून लिहिता यायला पाहिजे.

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *